नवी दिल्ली – आसामात भारत जोडो न्याय यात्रेच्या गाडीवर भाजपच्या कार्यककर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करून या प्रकाराला वाचा फोडली असून कॉंग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे.
या घटनेचा तपशील देताना जयराम रमेश यांनी म्हटल आहे की, आसामच्या सुनीतपुर भागातील जुमुगुरीघाट येथून आपली गाडी जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे हातात धरून माझी गाडी अडवली. त्यांनी गाडीवर थपडा मारल्या, काचेवर पाणी फेकले तेच गाडीवरील यात्रेची स्टीकर्स फाडून टाकली व आमच्या विरोधात घोषणाबाजी केली आम्ही शांतपणे गाडीतच बसून राहिलो.
त्यांना कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही.आसामच्या मुख्यमंत्र्यांच्यांच इशाऱ्यावरून हा प्रकार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. तथापि आम्ही असल्या कृत्यांनी दबून जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले व आम्ही आमच्या मार्गावरून जातच राहु असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे. आसामातील मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी या यात्रेच्या संबंधात कडक भूमिका घेत कॉंग्रेसला काही इशारेही दिले आहेत.
My vehicle was attacked a few minutes ago at Jumugurihat, Sunitpur by an unruly BJP crowd who also tore off the Bharat Jodo Nyay Yatra stickers from the windshield. They threw water and shouted anti-BJNY slogans. But we kept our composure, waved to the hooligans and sped away.… pic.twitter.com/IabpNa598P
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) January 21, 2024
या यात्रेच्या पहिल्या टप्प्यातही यात्रा मार्गावरील फलक आणि कॉंग्रेसचे झेंडे फाडून फेकून देण्याचे प्रकार घडले आहेत. यात्रेतील मार्गांना आणि कार्यक्रमांनाही सरकारकडून अनमुती नाकरली जात आहे या प्रकराच्या विरोधात कॉंग्रेसही आक्रमक झाली आहे.