कर्नाटक – कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची सध्या सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. अनेक नेते कर्नाटक दौरा करत आहे. नुकतेच एका सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्य केले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत. या विषामुळे तुम्ही मरुन जाताल’, असे वादग्रस्त विधान खर्गे यांनी केले आहे. खर्गे यांच्या विधानानंतर भाजपने संताप व्यक्त केला आहे.
खर्गे म्हणाले की, ‘पीएम मोदी हे विषारी सापासारखे आहेत. जर तुम्ही त्याचा स्वाद घेतला तर तुम्ही मराल. मोदी हे अजिबात चांगले व्यक्ती नाही.’ खरगे यांच्या विधानानंतर भाजप आणि काँग्रेसमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय हे विधान काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकते. भाजप देखील हा मुद्दा घेऊन कॉँग्रेसवर निशाणा साधू शकतो.
अमित मालवीयांचा हल्लाबोल –
यावर भाजपनेही खर्गे यांना सडेतोड उत्तर दिलंन आहे. पक्षाचे आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी खर्गे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणतात की पीएम मोदी हे विषारी साप आहे. खर्गे पंतप्रधान मोदींना ‘विषारी साप’ म्हणत आहेत. याआधी सोनिया गांधी ‘मौत का सौदागर’ असे मोदींना म्हणाल्या होत्या. काँग्रेसची सतत घसरण होत आहे. ते कर्नाटकात आपले स्थान गमावत आहे. तेव्हापासूनच हे सगळं सुरु झालं आहे. काँग्रेसला पराभव दिसू लागला की अशी वक्तव्य केली जातात.”
Now Congress Presidnet Kharge calls Prime Minister Modi ‘poisonous snake’…
What started with Sonia Gandhi’s ‘maut ka saudagar’, and we know how it ended, the Congress continues to plummet to new depths.
The desperation shows Congress is losing ground in Karnataka and knows it. pic.twitter.com/75FECizSOW
— Amit Malviya (@amitmalviya) April 27, 2023
अनुराग ठाकूर काय म्हणाले ?
तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही खरगे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे. “मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे, पण त्यांचे कोणी ऐकत नाही. त्यामुळे मी सोनिया गांधींच्याही पुढे जाऊ शकेन अशा पद्धतीने मी काय बोलू, असा विचार त्यांनी केला. पीएम मोदींविरोधात अशी भाषा काँग्रेससाठीच थडगे खोदणारी आहे, तुमचे नेते परकीय शक्तींसोबत भारताविरुद्ध कट रचतात आणि त्यांची मदत मागतात. मग भारतातील देशातील सर्वात लोकप्रिय नेत्याच्या विरोधात आक्षेपार्ह भाषण द्या. काँग्रेसची अवस्था पाणी नसलेल्या माशासारखी झाली आहे. ते सत्तेसाठी तळमळत आहेत आणि हताश होऊन अशी विधाने करत आहे,”
मल्लिकार्जुन खर्गे यांचे स्पष्टीकरण
हा वाद वाढल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “मी जे वक्तव्य केलं ते व्यक्तीगत नव्हतं, तर मोदींची विचारधारा विषारी सापासारखी असल्याचे माझं मत आहे. या विचारधाराची तुम्ही चव घेताल तर तुमचा मृत्यू निश्चित आहे असं मला म्हणायचं होतं,” असं स्पष्टीकरण खर्गे यांनी दिलं.