Bihar Floor Test। बिहारमधील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. मात्र भाजप-आरजेडी सरकारची बहुमत चाचणी होण्याअगोदर राज्यतील राजकारण तापले आहे. बहुमत चाचणीसाठी मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते विधानसभेत दाखल झालेत. मात्र अनेक आमदार अजूनही विधानसभेत पोहचले नसल्याने गोंधळ निर्माण झालाय.
नितीशकुमार यांच्या सरकारचे भविष्य हे आज ठरणार आहे. त्यासाठी विधानसभेच्याबहुमत चाचणीपूर्वी बिहारमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे.आतापर्यंत जेडीयू, आरजेडी आणि भाजपचे प्रत्येकी दोन आमदार विधानसभेत पोहोचलेले नाहीत. जेडीयूचे तीन आमदार संजीव कुमार, दिलीप राय आणि विमा भारती आलेले नाहीत.
काही आमदार गैरहजर Bihar Floor Test।
त्यासोबतच भाजपचे मिश्रीलाल यादव आणि रश्मी वर्मा आलेले नाहीत. याशिवाय राजदचे दोन आमदार नीलम देवी आणि चेतन आनंद यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे.
राज्यपालांचे अभिभाषण सुरु Bihar Floor Test।
दरम्यान, बिहारमध्ये बहुमत चाचणी होण्यापूर्वी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे अभिभाषण सुरू झाले आहे. त्यांनी राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले असे म्हटले, तसेच हे कायद्याचे ते कायम राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमच्या आमदारांना आमिष दाखवले: जेडीयू
तेजस्वी यादव यांच्या दाव्यावर जेडीयू नेते संजय झा म्हणाले की, त्यांनी आमच्याशी खेळण्याचा प्रयत्न केला, हा तपासाचा विषय आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांना पैसे आणि पदांचे आमिष दाखवण्यात आले. त्यामुळे अनेक आमदार गैरहजर झाले.
हेही वाचा
तेजस्वींची ‘खेळी’ की नितीशकुमार यांचा ‘विश्वास’ खरा ठरणार? बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग