अहमदाबाद – नुकतेच चारा घोटाळा प्रकरणी दोषी सापडल्याने लालू प्रसाद यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता चारा घोटाळा पेक्षा गुजरातमध्ये ६००० कोटींचा घोटाळा झाल्याची बातमी समोर आली असुन यामध्ये ५ हजार ते ६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. गुजरात सरकारच्या संस्थानी राज्यातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या नावाने कोळसा मागवला पण तो इतर राज्यांना महागड्या किंमतीत विकला. चारा घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा असल्याचे म्हणत काँग्रेसने यामध्ये कोणाचा हात आहे, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशी माहीती राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.
काय आहे प्रकरण
– . गुजरातमधील व्यापारी आणि लघु उद्योगांच्या नावावर कोल इंडियाच्या खाणीतून ६० लाख टन कोळसा पाठवण्यात आला
– सरासरी किंमत १,८०० कोटी रुपये प्रति टन ३,००० रुपये निश्चित केली
– मात्र तो व्यापारी आणि उद्योगांपर्यंत पोहोचला नाही.
– त्यानंतर ८ ते १० हजार रुपये प्रति टन दराने इतर राज्यात विकून घोटाळा करण्यात आला
गुजरात सरकार में ₹6,000 करोड़ का “कोयला घोटाला” !
• खदान से 60 लाख टन कोयला आया – हुआ ग़ायब।
• भाजपा सरकार ने 4 निजी कंपनियों को कोयला लाने को अधिकृत किया, 3 का पता ही नक़ली।शायद जबाब होगा –
‘न कोई कोयला लाया, न कोयला आया’,
मामला बंद, पैसा हज्म !https://t.co/lmP4e9lZK7— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) February 23, 2022
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी यासंदर्भात ट्विट करत “गुजरात सरकारने केला ६,००० कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा तर खाणीतून ६० लाख टन कोळसा आला आणि गायब झाला. भाजपा सरकारने चार खाजगी कंपन्यांना कोळसा आणण्यासाठी अधिकृत केले असून, तिघांचे पत्ते बनावट आहेत,” असे ही सुरजेवाला म्हणाले आहेत.