रांजणी – राज्यातील वन विभागांतर्गत येणाऱ्या पुणे सर्कलमध्ये बिबट्यांची सर्वाधिक दहशत निर्माण झाली असून, बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात गेल्या चार वर्षांत 7 जणांचा मृत्यू झाला असून, 38 जण गंभीररीत्या जखमी झाले आहे, तर हजारो जनावरे बिबट्याने फस्त केल्याचे वनविभागाचा सादर केलेलेल्या अहवालामुळे समोर आले आहे.
वनविभागाच्या पुणे सर्कलमध्ये गेल्या चार वर्षात बिबट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला असून, जिल्ह्याच्या उत्तर भागात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर त्याचबरोबर शिरुर तालुक्यात बिबट्यांनी उच्छाद मांडला आहे.
पुणे जिल्ह्याचा विचार केला तर बिबट्याच्या हल्ल्यात 2016-17 सालात जुन्नर तालुक्यात एक जणाचा मृत्यू, भोर तालुक्यात एक जणाचा मृत्यू, त्याचबरोबर 2017-18 मध्ये जुन्नर तालुक्यात एकाचा मृत्यू, तर 2018-19 मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.त्याचबरोबर 2019-20 मध्ये एका माणसाचा जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याचे सर्वाधिक प्रमाण हे जुन्नर तालुक्यात आहे. त्यानंतर आंबेगाव तालुक्यातही बिबट्याने सर्वाधिक हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.
धडाडीची कारवाई करण्यात अपयश
आंबेगाव तालुक्यात 2003-04मध्ये तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 38 बिबटे जेरबंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अशी धडाडीची कारवाई करण्यास वन विभागाला पूर्णत: अपयश आले. खरे तर आंबेगाव तालुक्यातील वनखात्याचे अधिकारी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास अपयशी ठरले आहेत किंबहुना या वनखात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये बिबटे जेरबंद करण्यासाठी उदासीनता दिसून येत असल्याच नागरीकांचे म्हणणे आहे.
चार वर्षात 4 हजार 606 जनावरे मृत्युमुखी
बिबट्यांनी गेल्या चार वर्षात हजारो जनावरांचा फडशा पाडला आहे. बिबट्यांचे वास्तव्य आता जंगलात किंवा वाड्यावड्यांपासून दूर राहिले नसून बिबट्या माणसांच्या घरात येऊ लागला आहे. पुणे सर्कलअंतर्गत पुणे, जुन्नर, भोर आणि सोलापूर यांचा समावेश होतो. या सर्कलमध्ये काही दिवसांत बिबट्यांची मोठ्या प्रमाणात दहशत वाढली आहे. गेल्या चार वर्षात बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात 4 हजार 606 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात जनावरे आणि माणसे मृत्युमुखी पडल्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. राज्यशासच्या वनविभागाने बिबट्यांच्या उपाययोजनांबाबत ठोस पावले उचचली नाही आणि बिबट्यांचे देखील संवर्धन वेळेत केले नाही तर बिबट्यांची भविष्यात दहशत वाढतच जाणार आणि पर्यायी हेच बिबटे मानवी वस्तीवरती येवून माणसांवर हल्ले केल्याशिवाय राहणार नसल्याचे मत
– विशाल तिवारी, वन्यजीवप्रेमी, रांजणी