शहरात आज सलग तिसऱ्या दिवशी उष्णतेने उच्चांक गाठला. घराबाहेर आले उन्हाचा चटका आणि घरात प्रचंड उकाड्याने हैराण अशी पुणेकरांची स्थिती झाली. अशा स्थितीत उष्माघातापासून बचावक रायचा असेल तर दुपारी घराबाहेर पडू नका. जास्तीत जास्त पाणी प्या, उन्हातून आल्यावर आशक्तपणा, चक्क र येत असेल तर डॉक्टरांच्या सल्लयाने उपचार घ्या, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आला आहे
लक्षणे आणि काळजी…
उन्हात फिरल्यावरच उष्माघात होता, उन्हात फिरल्यावरच उष्माघात होतो, असे नाही तर दिवसभर असलेल्या उष्णतेमुळे घरात असणाऱ्या व्यक्तीनाही त्रास हाऊे शकतो. त्यामुळे प्रामुख्याने 65 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती, एका वर्षाखालील आणि एक ते पाच वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती माता, मधुमेह, हृदयविकार तसेच अल्कोहोलिक व्यक्ती, अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती यांनी विशेष काळजी घ्यावी.
उष्णतेमुळे घाम येऊन अंगावर पुरळ येणे, घामोळ् या होणे, हातापायाला सजू येणे, स्नायू आखडणे, स्नायमूमध्ये पेटके येणे, थकवा येणे, शुद्ध हरपणे, तीव्र उष्णता, तीव्र अशक्तपणा, दिशाभूल , पूर्णपणे सतर्क नसणे, विसंगत वर्तन, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब कमी होणे, कोमा, शरीरातील पाणी कमी होऊन चक्कर येणे अथवा निर्जलीकरण होऊन उष्माघात (हिट स्ट्रोक) होण्याची शक्यता मोठ्याप्रमाणात असते.
अशी घ्या काळजी…
-जास्तीत जास्त पाणी प्यावे
– कामाचे तसेच घर थंड ठेवावे
– गॉगल, टोपी, फेटा यांचा वापर करावा
– सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत
– ओ.आर.एस., लिंबू सरबत, ताक , कोकम प्या.