Lok Sabha : काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी खासदारांच्या निलंबनावर माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलतांना शशी थरूर म्हणाले,’इतक्या खासदारांच्या निलंबनाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, त्यांना विरोधी पक्षमुक्त लोकसभा हवी आहे आणि ते राज्यसभेतही असेच काही करतील. हे पाहता भारताच्या संसदीय लोकशाहीला आदरांजली लिहायला सुरुवात करावी लागली.’
#WATCH | On suspension of more than 40 MPs from Lok Sabha, including his own, Congress MP Shashi Tharoor says, “…It is clear that they want an Opposition-mukt Lok Sabha and they will do something similar in Rajya Sabha. At this point, unfortunately, we have to start writing… pic.twitter.com/mh9LeXEgiB
— ANI (@ANI) December 19, 2023
ते पुढे म्हणाले,’माझ्या सहकाऱ्यांसोबत एकजुटीने मीही आजच्या आंदोलनात सहभागी झालो. त्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे, याचा अर्थ त्यांना त्यांची विधेयके कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करायची आहेत. हा संसदीय लोकशाहीचा विश्वासघात आहे.’ असे मला वाटते.
दरम्यान, लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आले आहे. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करण्यात आली यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू झाला. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावांचा समावेश आहे.
आज लोकसभेतून ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच आतापर्यंत 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. 18 डिसेंबरपर्यंत एकूण 92 खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. काँग्रेस नेते मनीष तिवारी, कार्ती चिदंबरम, शशी थरूर, बसपा (हकालपट्टी) दानिश अली, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, सपा खासदार एसटी हसन, टीएमसीच्या खासदार माला रॉय, सपा नेत्या डिंपल यादव आणि आम आदमी पार्टीचे खासदार सुशील कुमार रिंकू यांनाही निलंबित करण्यात आले आहे.