Adhir Ranjan Choudhary On Suspension : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे आज आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आले. अशा प्रकारे संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहे. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यातच काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी स्वतःसह अन्य सहकारी खासदारांच्या निलंबनावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी “मोदीजींवर असुरी शक्तींचा प्रभाव”असल्याची टीका केली आहे.
अधीर रंजन चौधरी यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी,”लोकांना मोदीजींचा अहंकार दिसत आहे, काल संसदेत काय झाले ते लोकांनी पाहिले आहे. बंगालमध्येही आम्ही लढत आहोत. आगामी काळात भारतातील युतीचे काय होणार हे हायकमांड ठरवेल.” असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावेळी “मोदीजींवर असुरी शक्तींचा प्रभाव आहे त्यामुळेच ते असे वागत आहेत”अशी टीका चौधरी यांनी केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे आज आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आले. अशा प्रकारे संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहे. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे.