कोलकाता : दिल्लीत उफाळलेला हिंसाचार हा सरकार पुरस्कत होता,अशी कडवट टीका प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.
दिल्ली हिंसाचारानंतर एक आठवड्याने ममता बॅनर्जी या विषयावर बोलल्या. त्या म्हणाल्या, हा सरकार पुरस्कृत नरसंहार होता. भारतीय जनता पक्षाला देशभर गुजरात दंगलीचे मॉडेल राबवायचे आहे. तृणमूल कॉंगेसच्या सभेत त्यांनी अमित शहा यांच्या गोली मारो… च्या घोषणा देणाऱ्याचा त्यांनी निषेध केला.
दिल्लीत झालेल्या नरसंहाराने मला तीव्र वेदना झाल्या आहेत. मला वाटते हा नरसंहार होता… हा दिल्लीतील हिंसाचार सरकार पुरस्कृत होता. हे सर्व सुधारीत नागरिकत्व कायद्यामुळे घडले आहे. दिल्ली हिंसाचारात किती जण मेले हे अमित शहा तुम्ही लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षाने दिल्ली दंगलीसाठी माफी मागितली पाहिजे.
भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालसह सर्व भारतात गुजरातच्या दंगलीचे मॉडेल राबवायचे आहे, असेही त्या म्हणाल्या.