नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या आंदोलनानंतर लोकसभेत कॉंग्रेस आणि भाजपा सदस्यांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक उडाली.
दिल्लीतील हिंसाचारात 46 जणांचे बळी गेले. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा त्यांच्या कर्तव्यात कमी पडले, असा आरोप करत कॉंग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीचे फलक त्यांनी लोकसभेत फडकावले.
सत्ताधारी पक्षांच्या आसनांकडे धावत जाऊन लुधीयानाचे खासदार गौरव गोगोई आणि सिंग बिट्टू यांनी शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. कॉंग्रेसच्या या खासदारांचा भाजपाच्या अनेक खासदारांनी पाठलाग करत असल्याचे चित्र लोकसभेत पहायला मिळाले.
अनेक खासदारांमध्ये शाब्दीक चकमक पहायला मिळाली. ते एकमेकांवर ओरडत असल्याचेही दिसून आले. कॉंग्रेसने ट्विटरवर शहा यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे