पुणे – अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या वादळाचा तडाखा मुंबईसह ठाणे, पालघर तसेच पुणे परिसरात बसण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला असून मंगळवारी (दि. 2) सायंकाळपासूनच जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला आहे.
तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व शक्यतो घरीच बसावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.