संगमनेर ( Balasaheb Thorat on Devendra Fadanvis ) – पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असे खळबळजनक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावरच आता कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, ते शरद पवार आहेत. पहाटेचा शपथविधी पवारांना विचारून झाला असता तर ते सरकार पडलेच नसते. त्यामुळे पहाटेचा शपथविधी शरद पवारांना विचारून झाला यात मला काही तथ्य वाटत नाही, असे थोरात म्हटले आहे.
फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. शरद पवार यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस हे सुसंस्कृत गृहस्थ आहेत, ते असत्याचा आधार घेतील, असे मला वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली होती. त्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही पहाटेचा शपथविधी शरद पवारांशी चर्चा करून झाल्याचे म्हटले आहे.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न | Balasaheb Thorat on Devendra Fadanvis
भाजपाकडे बोलण्यासारखे नसल्याने काहीतरी बोलून वाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी वेगळे वाद निर्माण करायचे, हे भाजपाच्या कामाचे वैशिष्ट्ये आहे. भाजपाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हे महाराष्ट्राला नवीन नाही, असा आरोपही थोरात यांनी यावेळी केलो.
सविस्तर वृत्त – https://t.co/RiifQirU8f@AshokChavanINC #congress #BJP #Nagpur pic.twitter.com/C0PJlWMtix
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) February 15, 2023