नवी दिल्ली – महाराष्ट्रात आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांनंतर भाजपला बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेचा अपेक्षित आकडा गाठण्यास अपयशी ठरली आहे. यामुळे दोन्ही राज्यात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांसमोर भीक मागत आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते गुलामी नबी आझाद यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एका जाहीर सभेत ते बोलत होते.
गुलाम नबी आझाद म्हणाले कि, नुकत्याच झालेल्या निवडणुकींच्या निकालाबद्दल मी मतदारांचे अभिनंदन करतो. हरियाणा व महाराष्ट्र निवडणुकीत भाजपचा पूर्णपणे पराभव झाला आहे. आता ते चौटाला आणि इतर अपक्षांसमोर सत्ता स्थापनेसाठी भीक मागत आहेत. त्यांना अद्याप महाराष्ट्रात सत्ताही स्थापन करता आली नाही, अशी टीका त्यांनी केली.
निवडणुका जवळ आल्या कि क्षेपणास्त्रे डागायची भाजपच्या या फॉर्म्युलाला जनतेने नाकारले आहे. शेतकऱ्यांचे आत्महत्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था यासारख्या समस्या नागरिकांना महत्वाच्या वाटत आहेत. मात्र या प्रश्नाबद्दल भाजपला काहीच वाटत नाही. भाजपा केवळ निवडणुका लढण्यासाठी सत्तेत आलेला पक्ष आहे. ते कामाच्या वेळीही केवळ निडवणुकांच्या नियोजनाबद्दल चर्चा करण्यात व्यस्त असतात, अशीही टीका त्यांनी केली.