नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आशिया करंडकातविशेष (Asia Cup 2023) कामगिरी केलेली नाही. त्याने या स्पर्धेत केवळ 25 धावा केल्या आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताला नुकतेच बांगलादेशविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप ठरली. त्यात भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) जडेजाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
कार्तिक म्हणाला, तो काही काळ कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट होता. त्याने चमकदार कामगिरी केली. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने बॅटने फार काही कमाल करून दाखवलेली नाही. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती.
परंतू आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची बॅट बोलायला तयार नाही. मात्र, तरीही भारतीय संघ सांभाळत आहे. तो आता धावा करू शकला नाही तर तो संघासाठी अडचणीचा आहे.
यावेळी बोलताना कार्तिकने अक्षर पटेलबाबतही प्रतिक्रीया दिली आहे. तो म्हणाला, अक्षरचीही गेल्या काही दिवसांमधील कामगिरी विशेष राहिलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाची डाव्या हाताच्या फिरकीपटूंची चिंता वाढली आहे.
आशिया करंडकात श्रीलंकेविरुद्ध खेळताना तो 29 धावा करून बाद झाला आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. बांगलादेशविरुद्ध त्याला 47 धावांत केवळ 1 बळी घेता आला. या सामन्यात त्याने निश्चितपणे 42 धावा केल्या. मात्र, भारतीय संघाला हा सामना जिंकता आला नाही.