Arvind Kejriwal । दिल्ली विधानसभेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावर आपले मत मांडले. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी सरकारची माहिती दिली. तसेच केंद्र सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना,’आज जेव्हा आपण अर्थसंकल्पावर चर्चा करत असतो तेव्हा मनीष सिसोदियाजींची आठवण येते. मनीष यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला. पुढील वर्षी ते अर्थसंकल्प सादर करतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विधानसभेत आपले मत मांडताना केजरीवाल यांनी, देशात दोन घटना घडल्या. पहिली घटना 2014 मध्ये होती जेव्हा भाजपने केंद्रात सरकार बनवले. तर 2015 मध्ये पुन्हा आम आदमी पार्टीने दिल्लीत सरकार बनवले. दोन्ही सरकारे प्रचंड बहुमताने स्थापन झाली. दोन्ही सरकारने निवडणुका जिंकण्याची हमी देणारे दोन मॉडेल समोर ठेवले. एक विकासाचे मॉडेल आणि दुसरे विनाशाचे मॉडेल. ‘आप’ने काम केले आणि विकासाचे मॉडेल ठेवले.
दिल्ली में इस बार का हमारा बजट हमारी माताओं-बहनों को और सशक्त एवं मज़बूत बनाने वाला बजट है। दिल्ली विधानसभा के बजट सत्र में CM @ArvindKejriwal जी का संबोधन। LIVE https://t.co/eQEwxRyzeJ
— AAP (@AamAadmiParty) March 9, 2024
तर भाजपने विनाशाचा आदर्श ठेवला. त्याचे दोन भाग आहेत. प्रथम सर्व पक्षांना संपवा. विरोधकांवर ED लावा, केस दाखल करा. त्यांची सरकारे पाडा. दुसरा भाग म्हणजे विरोधी सरकार काम करत असेल तर ते थांबवा. हे सगळं करण्यासाठी भाजपकडे पैशाची कमतरता नाही.
आता आम्ही हिमाचल सरकार पाडू Arvind Kejriwal ।
पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारले की इलेक्टोरल बाँड्समधून किती पैसे मिळाले? अजिबात सांगत नाही. किती सरकार पाडली माहीत नाही. आता ते हिमाचल सरकार पाडणार आहेत. ते म्हणतात, मोदी नाही तर कोण? सगळ्यांना तुरुंगात टाकलंय, कुणी नसेल तर तिथे कोण असेल? ” असे काही प्रश्न त्यांनी यावेळी केले.
श्रीराम जर या काळात असते तर… Arvind Kejriwal ।
दरम्यान, ईडीच्या कारवाईविषयी बोलताना,” प्रभूश्री रामचंद्रजी जर या काळात असते तर त्यांनी श्री रामच्या घरीही यांनी ईडी पाठवली असती. असा टोला यावेळी त्यांनी लगावला. तसेच ‘भाजपमध्ये जा नाहीतर तुरुंगात जा. तुम्ही समन्स पाठवाल तितक्या शाळा आम्ही बांधू. मी सभागृहात घोषणा करतो. 8 समन्स आले आहेत, मी आणखी 8 शाळा बांधणार” असेही त्यांनी यावेळी म्हटले.