संगमनेर – एकात्मता व प्रेमाचा संदेश घेऊन कन्याकुमारी ते काश्मीर निघालेली कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, यात्रेचे राज्य समन्वयक आ. बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या नियोजनाचे देशपातळीवर कौतुक होत आहे.
या यात्रेचे दि. 7 रोजी नांदेड जिल्ह्यात आगमन झाले असून नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमधून 382 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा जात आहे. यात्रेचे समन्वयक आ. थोरात यांनी प्रत्येक ठिकाणी केलेल्या नियोजनामुळे राज्यात या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यशोधन संपर्क कार्यालय येथून कॉंग्रेस पक्ष, पुरोगामी संघटना व इतर मित्र पक्षांचे कार्यकर्ते बुलढाणा व शेगाव येथील सभेसाठी रवाना झाले. या वेळी भारत माता की जय, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, कॉंग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. सभा व पदयात्रेसाठी आ. डॉ. सुधीर तांबे, युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे रवाना झाले.