Anil Deshmukh : राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे आता यावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी आता लवकरच काही आमदारांची घर वापसी होणार असल्याचे दावा केला आहे.
पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे. त्यांनी सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देताना काही आमदार निधीसाठी अजित पवार यांच्यासोबत गेले. पण आता मात्र लवकर मोठ्या प्रमाणात घर वापसी होईल. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
पुढे बोलताना अनिल देशमुख यांनी,”सर्व ठरलेल्या प्रमाणे सूड बुद्धीच राजकारण सुरू आहे आधी ठाकरेची शिवसेना शिंदे यांना दिली. आता आमचा पक्ष अजित पवार यांना दिला. पण सर्वांना माहीत आहे की, पक्ष कोणी स्थापन केला. आमचा पक्ष शरद पवार आहेत आणि आमचं निवडणूक चिन्हही शरद पवारच आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय सूडबुद्धीने दिला आहे. आज शरद पवार आज चिन्हाबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच “माझ्या मतदार संघात परडशिंगा येथे भाजपने एक महिला मेळावा आयोजित केला. हा त्यांचा अधिकार आहे. मात्र सरकारी अधिकारी खंड विकास अधिकारी यांनी सचिवांना पत्र पाठवलं तुम्ही लोकांना घेऊन या. शासकीय पत्र काढून हे सांगितलं जातं आहे. मेळावा भाजपचा आहे. मात्र त्या साठी खर्च सरकारकडून केला जाणार आहे. याची रीतसर तक्रार आम्ही करू. पक्षाच्या मेळावा साठी शासकीय यंत्रणेचा वापर आता पर्यंत झाला नाही, तो आता होत आहे, असे म्हणत अनिल देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.