कोलकाता: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. कोलकाता मध्ये एनआरसीबाबत आयोजित जनजागृती सभेला संबोधित करताना त्यांनी राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली.
एनआरसीचा संदर्भ देताना अमित शहा म्हणाले, ‘बंगालमध्ये एनआरसीबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. एनआरसीचे पहिले नागरिक सुधारणा विधेयक भाजप सरकार आणणार आहे. या विधेयकांतर्गत भारतात आलेल्या सर्व हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन निर्वासितांना कायमचे भारताचे नागरिकत्व दिले जाईल.
अमित शहा म्हणाले की, कोणत्याही शरणार्थीस जाऊ देणार नाही आणि कोणत्याही घुसखोराला राहू देणार नाही. तसेच आपल्या जमीनीवर परत आलेल्या सर्व हिंदू शरणार्थींना येथे नागरिकत्व दिले जाईल.
ममता सरकारवर हल्ला चढवत अमित शहा म्हणाले की, ममता दी जेव्हा विरोधात होत्या तेव्हा त्या घुसखोरांना दूर करण्याविषयी बोलत असत. या विषयावर त्यांनी राज्य विधानसभा अध्यक्षांच्या तोंडावरही शॉल देखील फेकली होती. आता हे लोक त्यांची व्होट बँक बनले आहेत, त्यामुळे त्यांना हटवावे असे ममता बॅनर्जी यांना वाटत नाही.
We had brought the Citizenship Amendment Bill in the RS, but TMC MPs had not allowed the Upper House to function.
They did not allow the bill to be passed, and due to this, there are people in our country who are yet to get Indian citizenship: Shri @AmitShah #BJP4SonarBangla pic.twitter.com/L0jjU5A4R2
— BJP (@BJP4India) October 1, 2019