येत्या २२ जानेवारीला संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन निमित्त जल्लोष साजरा केला जाणार आहे. २२ जानेवारीला राम मंदिरा निमित्त रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. अशातच या कार्यक्रमाला चार शंकराचार्य विरोध करत असल्याचे समोर येत आहे, स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.
त्यांच्या मते हा कार्यक्रम सनातन धर्मातील नियमानुसार तसेच शास्त्रांच्या विरोधात जाणून केला जात आहे. त्यामुळे ते उपस्थित राहणार नाही. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले,’चारही शंकराचार्य या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही. बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी प्रभू श्री रामाच्या मूर्तीचा अभिषेक करणे योग्य नाही. काम पूर्ण न करता राम मंदिराचे उद्घाटन करणे आणि तेथे रामाची मूर्ती बसवणे ही कल्पना योग्य नाही.’ असं म्हणत त्यांनी नियम सांगितले आहे.
याच मुद्यावर स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले, ‘माझ्याकडून कोणतीही सल्ला घेतला नाही,याचा मला राग आहे असे नाही, तर स्कंदपुराणानुसार नियम आणि विधी नीट पाळले नाहीत तर मूर्तीमध्ये वाईट गोष्टी प्रवेश करतात आणि त्या क्षेत्राचा नाश करतात.’ असेही त्यांनी सांगितले आहे.