Manoj Jarange Patil| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच मराठा उमेदवार निवडणुकीत लढण्यासाठी सज्ज होणार आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार देण्याच्या हालचाली झाल्या होत्या.
त्यानंतर अंतरवाली सराटीत बैठक झाली आणि मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सल्ला दिला. मराठा समाज बांधवांनी लोकसभा निवडणूक लढवायची की एकच उमेदवार द्यायचा, या दोन्ही विषयांवर गावागावात बैठका घेऊन चर्चा केली जात आहे. त्याबाबत आज 30 मार्च रोजी या सर्व बैठकांचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील काय घोषणा करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे.
मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार Manoj Jarange Patil|
त्यानुसार मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील, त्या उमेदवाराला सर्व गावांनी मतदान करायचे असा ठराव सर्वानुमते पास करण्यात येत आहेत. मनोज जरांगे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची बैठक आंतरवाली सराटीत आयोजित केली आहे. सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. यावेळी जरांगे यांनी राजकारणात उतरण्याचा सल्ला आंबेडकर यांनी दिला होता. परंतु निवडणूक न लढविण्याचा आणि राजकारणात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Manoj Jarange Patil|
हेही वाचा: