मुंबई – ब्रिटनमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यापासूनच जगभरातील अन्य देशांनी आपापली आरोग्य व्यवस्था हाय अलर्टवर ठेवली आहे. करोनाचा हा नवा स्ट्रेन नये यासाठी बहुतांश देशांनी ब्रिटनहून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक देखील रोखली आहे.
भारताने देखील खबरदारीचा उपाय म्हणून या उपाययोजना केल्या आहेत. मात्र असं असताना देखील नव्या स्ट्रेनने भारतात शिरकाव केला असून आजवर देशात ३८ रुग्णांना नव्या विषाणूची बाधा झाली आहे. अशातच आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीमुळे राज्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील आठ रुग्णांमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आली असून त्यांना विलगीकरण कशामध्ये ठेवण्यात आलं आहे. हे आठही रुग्ण ब्रिटनहून परतलेले असून यातील मुंबई येथील 5, तर पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणाचा समावेश असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
देशामध्ये करोनाचा उद्रेक झाल्यापासूनच महाराष्ट्रात विषाणूने हैदोस घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यातील मुंबई सारख्या महानगरांपासून ते अगदी खेडोपाड्यांपर्यंत करोनाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र मागील काही महिन्यांपासून राज्यातील करोनाचा आलेख खाली पडताना दिसत आहे. अशातच आता नव्या स्ट्रेनने राज्यात शिरकाव केल्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. करोनाचा हा नवा स्ट्रेन आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 4, 2021