मुंबई – शाहरुख खान आणि अजय देवगणनंतर आता तिसरे नाव पान मसाल्याच्या जाहिरातीतही पाहायला मिळत आहे. यावेळी अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीचे प्रमोशन सुरू केले आहे. त्यामुळे आता अक्षय चांगलाच अडचणीत सापडला आहे. अक्षय कुमारने टीव्हीवर ‘बोलो केसरी..’ बोलल्यानंतर, सेन्सॉर बोर्डाचे माजी प्रमुख पहलाज निहलानी यांनी अक्षयच्या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच या जाहिरातीवरून गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर त्याला चांगलेच ट्रोल केले. त्याचा चाहत्यांनाही या जाहिरातीच्या निर्णयावरून सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022
त्यानंतर आता अभिनेता अक्षय कुमारने इलायची ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पद सोडले आहे. याबाबत त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफीही मागितली आहे.
आपल्या ट्विटमध्ये अक्षयने लिहिले की,“मला माफ करा. मी तुमची, माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांतील तुमच्या प्रतिक्रियेचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे. मी तंबाखूचे समर्थन करत नाही आणि करणार नाही, तरीही विमल इलायची यांच्याशी असलेल्या माझ्या सहवासाच्या प्रकाशात तुमच्या भावना व्यक्त केल्याबद्दल मी आदर करतो. सर्व नम्रतेने, मी मागे सरकतो. मी योग्य कारणासाठी संपूर्ण समर्थन शुल्क योगदान देण्याचे ठरवले आहे. माझ्यावर बंधनकारक असलेल्या कराराच्या कायदेशीर कालावधीपर्यंत ब्रँड जाहिरातींचे प्रसारण सुरू ठेवू शकतो, परंतु मी माझ्या भविष्यातील निवडी करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे वचन देतो. त्या बदल्यात मी कायम तुमचे प्रेम आणि शुभेच्छा मागत राहीन.” त्याचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. मात्र जाहिरातीवरून गेल्या काही दिवसांमध्ये त्याला चांगलेच ट्रोल केले गेले.
त्याच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, अक्षय कुमारचा पृथ्वीराज चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचसोबत बडे मियाँ छोटे मियाँ, ओह माय गॉड 2 आणि गोरखा ह्या चित्रपटांवर त्याचे काम सुरु आहे, बडे मियाँ छोटे मियाँ टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत आहेत.