मुंबई – पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मताचे समर्थन केले. तसेच दादा आमचे नेते आहेत. या सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे देखील पवार यांनी समर्थन केले.
यावर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी सुद्धा माध्यमांशी बोलतांना अजित दादांनी त्यांची लाईन क्लिअर केली आहे असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
सामंत पुढे म्हणाले,’पवारांच्या विधानानंतर संभ्रमात राहायची आवश्यकता नाही. अजित पवार यांनी स्पष्ट केला आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत.अजित पवारांकडून कुठलाही संभ्रम नाही. मी येताना पाहिलं की पिंपरी चिंचवड, पुणेमध्ये ज्या पद्धतीने अजित दादांचे स्वागत होत आहे ते न भूतो न भविष्यती आहे. त्याच्यावर जर प्रतिक्रिया अशी असेल की अजित दादा नेते आहेत, तर मला वाटतं की काही लोकांचं पाऊल NDA कडे येत आहे का अशी शंका निर्माण होत आहे.’
‘अजित दादांनी त्यांची लाईन क्लिअर केली आहे. INDIA किती एक संघ राहतात हे पाहणं आवश्यक आहे, हा खरा सभ्रम त्यांच्यासाठी आहे. राष्ट्रवादी फुटली का ? यावर सामंत पुढे म्हणाले,’दुसऱ्या पक्षावर बोलण्याचा अधिकार मला नाही.मी आधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केलं आहे. पक्ष सोडला म्हणून नेत्यावर तोंडसुख घेणारा मी नाही…अजित दादा आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष महायुती सोबत आहे.’