खडकवासला : घेरा- सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत आज शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस पडल्याने आतकरवाडी येथील एका व्यक्तीवर मुख्य रस्त्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. सिंहगडाचे पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीत स्मशानभूमी नाही. ओढ्यालगत शेताच्या बांधावर छोट्याशा जागेत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु, पाउस आल्यावर ओढ्याला जास्त पाणी असते. त्यावेळी तेथे पोचणे शक्य होत नाही. त्यामुळे, रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नसतो.
आज पाऊस आणि ओढ्याचे पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते. अखेर तीन तासानंतर अखेर ग्रामस्थांनी भर पावसातच चितेवर आसरा म्हणून लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकुन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. अंत्यविधीप्रसंगी पंचक्रोशीतील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते. मुसळधार पावसातच या मृत व्यक्तीवर अंत्यविधी सुरु होता.ग्रुप ग्रामपंचायत घेरा सिंहगडला चार महसुली गावे असून देखील गावठाणच नाही.
घेरा सिंहगड ग्रामपंचायतच्या आतकरवाडी, सांबरेवाडी, थोपटेवाडी, भडाळेवाडी, दुरुकदरा व इतर ठिकाणी स्मशानभूमीसाठी राज्य सरकारमार्फत वन विभागाची जागा मिळावी. परिणामी राज्य सरकार, जिल्हा परिषदेमार्फत स्मशानभूमी उभारता आली नाही. गावठाण मागणीचा प्रस्ताव राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे पाच सात वर्षापासून पडून आहे. वन विभागाच्या जाचक अटीमुळे प्रस्ताव अडकले आहेत. घेरा सिंहगड मधील मधील नागरिकांची स्मशानभूमीसाठीची हाल अपेष्टा सुरु आहेत. असे आणखी किती दिवस सुरु राहणार असा सवाल ग्रामस्थ करीत आहे.
ज्योती लहु पन्हाळकर वय. ४१ वर्ष…
आदिवासी कोळी महादेव जमातीची महिला.. गुरुवारी निधन झाले. आज सकाळी अंत्यसंस्कार होते..
भर पाऊसात अंत्यसंस्कार.. पेट ती चिता विझु लागल्याने ग्रामस्थांना पेटत्या चितेवर पत्रे धरावे लागले.. पावसामुळे अंत्यसंस्कार काही तास लांबवले पावसाने उघडीप दिली.. मात्र चिता पेटवल्या नंतर काही मिनिटांत जोरदार पाऊस सुरू झाल्यावर जोरदार पाऊसाला सुरुवात झाली..