मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. जे एसटी कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, 31 मार्च पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना कामावार रुजू होण्याचे आवाहन केले होते. परिवहन मंत्री अनिल परब यांनां सुचना देण्यात आल्या होत्या की, 31 मार्च पर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांना संधी द्या. आता तशाप्रकारची संधी दिली उद्या पासून मात्र कठोर निर्णय घेतला जाणार आहे. अशी साधारण शक्यता आहे. असे पवार यावेळी म्हणाले आहेत.
नेमकी कोणती कठोर भूमिका पवार घेणार याविषयी विचारणी केली असता वेळ पडली तर नवीन भरती होऊ शकते किंवा पीएमपीएलच्या धर्तीवर ज्याप्रमाणे पुण्यात व मुंबईत बस भाडे तत्वावर घेतल्या जातात त्याप्रमाणे एसटीमध्ये सुद्धा ही प्रणाली वापरली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले आहे.
राज्यात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलीनीकरणासाठी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील एसटीची सेवा बंद आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.