पुणे: मराठा धनगर आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यात गाजत असून यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना आज पुण्यात असं म्हटलं आहे की महाविकास आघाडीच्या काळात हायकोर्टामध्ये आणि माहितीच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण दिलेले टिकले नाही त्यामुळे या संदर्भात तज्ञाचे मत लक्षात घेऊन सरकार आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे स्वतः मुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून चर्चा करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिलेली आहे.
पुण्यात एका आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमासाठी अजित पवार पुण्यात आले होते त्यावेळी ते माध्यमाशी बोलताना म्हणाले की जरांगे पाटलांचा आंदोलन चालू आहे त्यांच्याशी सरकार स्तरावरून बोलण्या होत आहे परंतु त्यातून मार्ग निघत नाही मुख्यमंत्री बोलता येत शेवटी त्यांनी शिष्टमंडळ सुद्धा बोलावलेला आहे परंतु मार्ग निघत नसल्याचे सध्या दिसत असून त्यावर सरकार काम करत आहे काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली त्या बैठकीला सगळे बहुतांश मंत्री हजर होते परंतु मी बाहेर असल्यामुळे बैठकीला जाऊ शकलो नाही जेवढी माहिती मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाविषयी माध्यमांना दिली तेवढीच माझ्याकडे सुद्धा आहे परंतु सरकार आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अजित पवार म्हणाले.
राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर सुद्धा बोलताना ते म्हणाले की आता हवामान खात्याने पाऊस चांगला होईल असे सांगितले आहे पुणे शहराच्या जवळचे जे काही धरण आहेत त्यांच्याकडे पाणीसाठा वाढलेला आहे आणखी पाणीसाठा वाढणार आहे परंतु अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी कशा अधिकारी यांना आम्ही कामाला लावून दुष्काळावरच्या उपयोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत सरकार सुद्धा पूर्ण लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले.
राज्यातील शैक्षणिक धोरण हे सुधारले पाहिजे असे मला वाटते मराठी शाळा इंग्रजी शाळा अशी टीका करण्यापेक्षा जे मराठी शाळेत व आंदोलन करतात त्यांची मुलगी इंग्रजी शाळा शिकतात असं म्हणत त्याने राज ठाकरे यांना टोला लगावला असेल आपण बदल स्वीकारला पाहिजे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आता पहिलीपासून इंग्रजी शाळा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे स्वागत करूया अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे.
भाजप नेते आमदार नितेश राणे हे पुण्यात येऊन पुनमेश्वर मंदिरावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत तर असं वक्तव्य कोणीही करू नये मी त्यांच्या वरिष्ठांशी बोलून याबाबत काय झालं ते सांगेल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेले आहे.