मुंबई – ओबीसीतूनच आरक्षण मिळावे अशी मराठा समाजाने भूमिका घेतल्याचे दिसते आहे. मात्र सरकारने याबाबत ओबीसीवर अन्याय केला तर ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आणि मुंबई बंद पाडू, असा इशारा बाळासाहेब सानप यांनी दिला आहे.
सानप पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, हे मराठा समाजाने विसरू नये, मात्र ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसीवर अन्याय होईल. मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही, जर असं होत असेल तर आम्ही मुंबई तात्काळ बंद पाडू, असा गर्भित इशाराही सानपांनी दिला आहे