मुंबई – ‘पुष्पाः द राईज’ सिनेमा प्रदर्शित झाल्यांतर दाक्षिणात्य अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. सध्या सर्वत्र याच सिनेमाचा बोलबाला असून, सिनेमातील डायलॉग आणि गाणी प्रचंड गाजत आहेत. पुष्पा मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’ आणि अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ यांची जोडी प्रेक्षकांना चांगली भावली आहे.
रश्मिका हे नाव कलाक्षेत्रात रुची असलेल्यांसाठी सर्वपरिचत आहे. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्यामुळेच रश्मिका टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. 2020 मध्ये गुगलबाबाने रश्मिका मंदाना नॅशनल क्रश असल्याचं जाहीर केलं होत. दरम्यान, पुष्पा सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर आता तिची गाडी सुसाट वेगाने सुटली आहे.
मात्र, अश्यातच तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. रश्मिकाच्या या निर्णयामुळे तिचे फॅन्स काहीसे नाराज सुद्धा होण्याची शक्यता आहे. नुकतंच रश्मिकानं एका मुलाखती दरम्यान ‘आपण पहिल्याच सिनेमानंतर हे क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतल्याचं’ सांगितलं आहे. 2016 मध्ये कलाविश्वात सक्रीय झालेल्या रश्मिकाने ‘किरिक पार्टी’ या कन्नड सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. सध्या रश्मिका कडे अनेक सिनेमांची रांग लागली आहे.
टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील काही निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याकडून आपल्याला अपमानस्पद वागणूक मिळाल्याचे रश्मिकानं सांगितलं आहे. मी टॉलीवूड कायमचे सोडणार होते. एवढा मानसिक त्रास मला झाला होता. माझ्या वडिलांनी मला त्यांचा बिझनेस पाहण्यासाठी सांगितले. तसेच, वडिलांनी मला एकच सिनेमा करायचा आणि पुन्हा ते क्षेत्र सोडून द्यायचे असं सांगितलं होत. त्यांचा हा निर्णय ऐकून काही काळासाठी माझी मानसिकता पूर्ण पणे ढासळून गेली होती. अशी आठवण रश्मिकानं यावेळी सांगितली.