मुंबई – एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहत असतात. अशातच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे मात्र यावेळी ते त्यांच्या विधानांमुळे नाही तर वजन कमी केल्यामुळे चर्चेत आहे.
शहाजीबापू पाटील यांनी अवघ्या आठ दिवसात नऊ किलो वजन घटवलं आहे. एवढ्या कमी वेळात वजन कमी झाल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. अवघ्या आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केल्याने जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एवढ्या कमी दिवसात त्यांनी हे कसे केले असा प्रश्नही चर्चेत आला आहे.
याच मुद्यावरून शहाजीबापूंनी वृत्त माध्यमांतून प्रश्न विचारला असता ते म्हणाले,’माझा गुडघा दुखत होता. त्यामुळे डॉक्टरांनी गेल्यावर त्यांनी मला दोन पर्याय दिले एकतर ऑपरेशन करणं किंवा वजन कमी करणं. ऑपरेशन करण्यापेक्षा मी वजन कमी करण्याचा पर्याय निवडला. यासाठी मी वजन कमी करण्यासाठी बंगळुरूला गेलो.
तेथे श्री श्री रवीशंकर यांच्या आश्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचा 10 दिवसांचा कोर्स केला. सुरुवाती पाच ते सहा दिवस त्यांनी पंचकर्म केलं. तेव्हा वेगवेगळे काढे प्यायला दिले. वेगवेगळ्या तेल आणि पावडरने मालिश केली. या सगळ्याने माझं चार किलो वजन कमी झालं.’असं म्हणत त्यांनी उत्तर दिले आहे,