मुंबई – संजय राऊत देशातील लोकशाही, समाजातील मानसिकता बिघडवण्याचे काम करत आहेत. हे महाराष्ट्राला न शोभणारे आहे. सध्या संजय राऊत हे नागापेक्षाही विषारी फुत्कार त्यांच्या तोंडातून टाकत आहेत. परंतू जनता त्यांना भिक घालणार नाही, अशी टीका शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली.
शहाजी बापू म्हणाले, मला खात्री आहे हा महाराष्ट्र सुजान आणि बुद्धीमान आहे. राजकारणाचे परिपक्व राज्य म्हणून या राज्याकडे पाहिले जाते. जनता संजय राऊत यांना भिक घालत नाही.
#Shivjayanti2023 : शिवरायांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बृहद कार्यक्रम – उपमुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्रात चाटूगिरी सुरु असल्याचे म्हणणे एका खासदार, संसद सदस्य असलेल्या व्यक्तीकडून असे बोलण्याची अपेक्षा नाही. जनसामान्यांच्या मनात लोकाशाही विषयी शंका निर्माण करण्याचे चुकीचे काम राऊत करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.