नवी दिल्ली – गृह मंत्रालयाने आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार इंडो-तिबेट तिबेटन बॉर्डर पोलीस संघटनेचे प्रमुख अनिश दयाल सिंग यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. अनिश दयाल सिंग, हे १९८८ च्या बॅचचे मणिपूर केडरचे आयपीएस अधिकारीआहेत. ते सीआरपीएफ दलाचे विद्यमान प्रमुख एसएल थाओसेन यांच्या निवृत्तीनंतर सीआरपीएफचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारतील.
डिसेंबर २०२४ पर्यंत सेवा कालावधी असलेले अनिश दयाल सिंग हे गुरुवारपासून सीआरपीएफचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतील.
सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलिस दल) हे देशातील एक महत्वाचे निमलष्करी दल आहे. या दलात २४६ बटालियन कार्यरत आहेत. त्यात १५आरएएफ बटालियन, १० कोब्रा बटालियन, पाच सिग्नल बटालियन आणि एक विशेष कर्तव्य गट आणि एक संसद कर्तव्य गट कार्यरत आहेत. सध्या या दलात सुमारे साडे तीन लाख जवान आणि कर्मचारी कार्यरत आहेत.
सीआरपीएफचा वापर दंगल नियंत्रण, दहशतवादविरोधी किंवा बंडखोरी कारवाया नियंत्रण, वामपंथी अतिरेकी किंवा नक्षलवादाशी सामना करणे, मतनदानाच्यावेळी सुरक्षा प्रदान करणे यासाठी या दलाचा वापर केला जातो.नैसर्गिक आपत्तीच्यावेळी बचाव कार्यासाठीही या दलाचा वापर केला जातो.