मुंबई : राज्यात लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश आता 31 मार्च पर्यंत लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी नगर पंचायत क्षेत्रापर्यंत लागू असेल. कोणीही या काळात घराबाहेर अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले होते. मात्र,केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश देऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण कामाविना फिरताना आढळून आले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्हिडियो शेअर करत कोणी न ऐकल्यास त्यांच्यावर नाईलाजानं कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.
दरम्यान, सोशल डिस्टंसिंग मेंटेन करणं आवश्यक आहे. लोकांनी गर्दी करू नये अशी विनंती केली जात आहे. जनतेनं असं होऊ देऊ नये, तरीही कोणी न ऐकल्यास त्यांच्यावर नाईलाजानं कारवाई करण्यात येईल, असल्याचंही ते म्हणाले.
राजेश टोपे पुढे म्हणाले , ‘जनतेनं जमावबंदीचे आदेशाचं पालन करावं, कोणत्याही परिस्थितीत सर्वांच्या आरोग्यासाठी हे करणं आवश्यक आहे. लोकांनी न ऐकल्यास कारवाई करावी लागेल. पोलिसांना आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत, असंही त्यांनी नमूद केल आहे.