आम्ही भूमी ग्रीन एनर्जी या कंपनीच्या माध्यमातून कचरा प्रक्रिया करत आहोत. आपणास माहीत आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी ज्या गोष्टींकडे कधीही आपली जबाबदारी म्हणून पहिले नाही. वेळोवेळी फक्त नकारात्मक नजरेनेच पाहत आलो आहोत. कचरा म्हटले की फक्त दुर्गंधीच अशी भावना येते. किती कचरा केला आहे.आपला कचरा फक्त आपल्या स्वतःच्या घरातून बाहेर गेला पाहिजे. मग तो रस्त्यावर फेकला जातो, नदीमध्ये टाकला जातो, मिळेल त्या ठिकाणी अस्तव्यास्त स्वरूपात टाकला जातो. अशा क्षेत्रात गेले 4 वर्षे आम्ही काम करत आहोत.
काम करण्याच्या अगोदर कित्येक वेळा आम्हाला सुद्धा असेच वाटायचे, कोणी तरी पुढे यावे व भारतातील कचरा प्रक्रिया करण्यासाठी यशस्वी तंत्रज्ञान विकसित करावे. तसेच कोणाला ना कोणाला संत गाडगेबाबांनी स्वच्छतेविषयी संपूर्ण आयुष्य व्यतीत केले व आरोग्याचे महत्व लोकांना सांगितले त्याप्रमाणे लोकांना महत्व सांगावे. म्हणुन मग आमच्या सर्व संचालकांच्या मनात विचार आला की आपणच या क्षेत्रात काम करायचे. म्हणुन आम्ही सर्व मित्रांनी विचार केला आणि या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
तसे मुळचे आम्ही सर्व आपल्या आपल्या इतर क्षेत्रात काम करत होतो. परंतु या कचरा निर्मूलन क्षेत्राचा मागील कित्येक वर्षाचा आढावा घेतला तर असे लक्षात आले कि कित्तेक लोक या क्षेत्रात यशस्वी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण कोणालाही या क्षेत्रात पाहिजे असे संपूर्ण यश प्राप्त झाले नाही. कोणतेही विशिष्ट असे तंत्रज्ञान यशस्वी झाले नाही.म्हणून आम्ही अश्या क्षेत्रात प्रयत्न करायचा, असं ठरवलं.
आपणास या क्षेत्रात काही तरी वेगळा विचार करावा लागेल, ज्यामध्ये सामाजिक दृष्टीकोन व व्यावसायिक स्थर्य याची सांगड घालून एक नवीन भारतीय तंत्रज्ञान विकसित करावे लागेल आणि यासर्व गोष्टीचा विचार करून आम्ही कचरा निर्मूलन क्षेत्रात काम चालु केले, ज्यामधे आम्ही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून ओला कचरा, सुका कचरा, मिक्स कचरा, आणि वर्षानु वर्षे फुरसुंगी कचरा डेपोमध्ये पडुन असलेला कचरा.
अशा सर्व प्रकारच्या कचऱ्यावर आज एक यशस्वी भारतीय तंत्रज्ञान विकसित केले, ज्यात वर्ष 2016 च्या नियमनुसार 4 च्या टेक्नॉलाजी रिकव्हर, रिसायकल, रियुज व रिड्युस या तत्वाचा वापर करून मशीनरी बनवणे, प्रक्रिया करणे, आणि प्रक्रिया करून निर्माण झालेले उत्पादित पदार्थाची स्वतः विल्लेवाट लावणे. या प्रमाणे कचऱ्याचे उत्पादन ते वापर याधर्तीवर काम करत आहोत.
भूमी ग्रीन एनर्जी कंपनीच्या उरळी देवाची येथील बायो-मायनिंग प्रकल्पाला पुणे महानगरपालिकेच्या अति. महापालिका आयुक्त रुबल अगरवाल मॅडम यांनी भेट देऊन संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. सदर बायो-मायनिंग प्रकल्पा हा भारतातील पहिला प्रकल्प आहे ज्यामध्ये जुन्या लिगेसी वेस्टचे प्रॉडक्ट मध्ये रूपांतर होऊन कचऱ्याची विल्लेवाट लावली जाते, असे त्यांनी अधोरेखित केले व प्रकल्प खुप छान प्रकारे चालू असून कामाचे कौतुक करून कंपनीच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच अति. महापालिका आयुक्तरुबल अगरवाल मॅडम यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
अशा प्रकारे भुमी ग्रीन एनर्जी गेले चार वर्ष कचरा निर्मूलन क्षेत्रात यशस्वी पणे काम करत असुन आपल्या सामाजिक कर्त्यव्याचे भान म्हणून कचरा निर्मूलन व “स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत स्वच्छता व निरोगी आरोग्यसाठी विविध उपक्रम राबवतआहे. यामध्ये खालील उपक्रमांचे आयोजन भुमी कंपनीकडून करण्यात आले.
1. शालेय विद्यार्थ्यांना प्रकल्प भेट घडवून माहिती देणे,
2. सेंद्रीय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे,
3. नदी प्रदूषण होऊ नये म्हणून निर्माल्य व मूर्तीदान बदल्यात खत भेट देणे
अशा विविध प्रकारचे उपक्रम करून भुमी कंपनी आपली सामाजिक बांधिलकी जपत असते.
तसेच भुमी कंपनीच्या यशस्वी तंत्रज्ञान पाहणीसाठी भारतातील व भारता बाहेरील विविध लोकांनी भेट दिलेली आहे. त्यात शासकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील बहुसंख्य नामांकितांनी आमच्या चांगल्या कामाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. अशाच प्रकारे भुमी कंपनी “वेस्ट टु हेल्थ अँड वेल्थ व सोलुशन फॉर वेस्ट, यु कॅन ट्रस्ट या धर्तीवर काम करण्यास अहोरात्र कटिबद्ध आहे.