मुंबई – राज्यात 24 तासांमध्ये 5 हजार 902 रुग्ण नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहेत,तर 24 तासांमध्ये 7 हजार 883 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत 14 लाख 94 हजार 809 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामुळे राज्यातीलतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता 89.69 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच मागील 24 तासांमध्ये 156 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.62 टक्के इतका आहे.
राज्यात आजपर्यंत करण्यात आलेल्या तपासण्यातील 88 लाख 37 हजार 133 नमुन्यांपैकी 16 लाख 66 हजार 668 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 लाख 33 हजार 687 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 12 हजार 690 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 27 हजार ऍक्टिव्ह केसेस आहेत.
आज राज्यात 5 हजार 902 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 16 लाख 66 हजार 668 इतकी झाली आहे.