नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविली आहे. 30 नोव्हेंबर 2020 ही रिटर्न भरण्याची अंतिम तारीख होती. ती वाढवून 31 डिसेंबर 2020 करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या करदात्यांना पतरावा अहवाल लागत नाही, त्यांना 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न फाइल करता येणार आहे. करदात्यामध्ये ज्यांना रिटर्न्सचे ऑडिट करवे लागते त्या करदात्यांसाठी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी 2021 निश्चित करण्यात आली आहे. त्यापूर्वी मे महिण्यामध्ये सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. त्याव्यतिरिक्त कर विवादांचे निराकरण करण्यात यावे यासाठी असलेल्या ‘विवाद ते आत्मविश्वास योजने’चा लाभ देखील कोणत्याही शुल्काविना 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
याचा फायदा व्यापारी, व्यावसायिक, पगारदार तसेच इतरही करदात्यांना होणार आहे. कोरोना महासाथीच्या संकटातून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे, तरी देखील अद्यापही अनेक गोष्टींवर बंदी आहे. अशा परिस्थितीत आयकर विवरणास आवस्यक कागदपत्रे जमा करणे अवघड आहे. अनेकजण सध्या घरून काम करत आहेत. परतावा भरण्यास उशीर होत असल्यास आता दंड आणि डिफाॅल्ट यांची कटकट संपणार आहे, असे मत प्राप्तिकर प्रकरण सीए आणि सीए फर्म एसके मिश्रा आणि गुजराती भागीदार कमलाकर मिश्रा यांनी मांडले आहे.