नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या काळात १० कोटी नोकऱ्या धोक्यात आल्याची केंद्र सरकारने संसदीय समितीला माहिती दिली आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी म्हणाले कि, नोटबंदी, जीएसटी, करोनामुळे झालेली दुर्व्यवस्था आणि अर्थव्यवस्था व बेरोजगारी असे चार पॉईंट्स त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या भांडवलशाही माध्यमांनी मायाजाळ तयार केले आहे. हे भ्रम लवकर तुटणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी बैठकीत केंद्रीय अधिकाऱ्यांना धोक्यात आलेल्या नोकऱ्यांबद्दल माहिती दिली.