नवी दिल्ली – जीएसटी यंत्रणा अंमलात आल्यानंतर राज्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकार ही रक्कम देणार होते, मात्र बऱ्याच राज्याची रक्कम थकीत आहे, असे आंध्र प्रदेशाचे अर्थमंत्री बुगन्ना रेड्डी यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने ही रक्कम सध्याच्या अडचणीच्या काळात शक्य तितक्या लवकर राज्यांना द्यावी असे आवाहन त्यांनी केले. आंध्र प्रदेशाला केंद्र सरकारकडून जीएसटी नुकसान भरपाईपोटी 3,832 कोटी रुपये येणे आहे. मात्र बराच पाठपुरावा करूनही केंद्र सरकारकडून ही रक्कम उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या राज्यांचा मसूल कमी झाला आहे. त्यामुळे राज्यांना त्यांच्या वार्षीक उत्पन्नाच्या 2 टक्के अधिक रकमेचे कर्ज घेण्याची परवारगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र हे कर्ज उभारण्यास बराचा वेळ लागलणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांची नुकसानभरपाई लवकर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.