Narendra Modi letter to citizens| आज निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. लोकसभेसोबतच ओडिशा, सिक्किम, अरूणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांत विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर लगेचच देशभरात आचारसंहिता लागू होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील नागरिकांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मागील 10 वर्षातील विकास कामांचा उल्लेख केला आहे.
नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना पत्र लिहिताना म्हटले की, ‘आपल्या नात्याला एक दशक पूर्ण होत आहे. तुमचं समर्थन सातत्याने मिळत राहील, याचा मला विश्वास आहे. आम्ही राष्ट्रनिर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न करत राहू. ही मोदींची गॅरंटी आहे’, असा दावा त्यांनी यातून केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात नेमकं काय? Narendra Modi letter to citizens|
पंतप्रधान मोदींनी पत्राच्या सुरुवातीला म्हटलं की, ‘आपल्या नात्याला एक दशक पूर्ण होत आहे. 140 कोटी भारतीयांनी विश्वास आणि पाठिंबा दिल्यामुळे लोकांच्या जीवनात परिवर्तन झालं आहे. गेल्या 10 वर्षातील हे सर्वात मोठं यश आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.’
विविध योजना सुरू Narendra Modi letter to citizens|
‘प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे, सर्वांसाठी वीज, पाणी आणि गॅसची योग्य व्यवस्था, आयुष्मान भारत योजनेतून उपचारांची व्यवस्था. शेतकरी बंधू-भगिनींना आर्थिक मदत, मातृ वंदना योजनेतून माता-भगिनींना केलेली मदत केवळ तुमचा विश्वास आणि विश्वास माझ्या पाठीशी असल्यामुळेच सार्थकी लागली.’
या पत्रात त्यांनी जीएसटीचाही उल्लेख केला आहे. कलम ३७० हटवणे, तिहेरी तलाकवर नवीन कायदा करणे, महिलांसाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणणे याचा उल्लेखही केला आहे. ‘आपला देश परंपरा आणि आधुनिकता हे दोन्ही घेऊन पुढे जात आहे. मागील दहा वर्षात पुढील पीढीसाठी पायाभूत सुविधांचा पाया रचला. आपल्या राष्ट्र आणि सांस्कृतिक वारशातही मोठा बदल झाला. तुमचा विश्वास आणि पाठिंब्यामुळे जीएसटी लागू केली, कलम ३७० हटवलं, तिहेरी तलाकवर नवा कायदा आणला, नारी शक्ती वंदन कायदा, संसद भवनाचं उद्घाटन, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात कठोर निर्णय घेतले.’
‘तुमचं समर्थन कल्याणकारी निर्णय, महत्वाच्या योजना तयार करणे या बाबी योजनांची अंमलबजावणी करण्यास शक्ती देते. तसेच विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी तुमचे विचार, सल्ला आणि समर्थनाची आवश्यकता आहे. याची वाट पाहतोय. आपण एकत्र येऊन देशाला नवीन उंचीवर नेऊ. तुम्हला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा,’ असेही यात म्हंटले आहे.
हेही वाचा:
अंबादास दानवे मोठा निर्णय घेणार? शिंदे गटात जाण्याची शक्यता; ‘या’ कारणामुळे नाराज