सोमाटणे, (वार्ताहर) – शिरगाव येथे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या वृद्ध शेतकऱ्याच्य कुटुंबीयांना ‘महावितरण’कडून चार लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली. मृत शेतकऱ्याच्या पत्नीच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली.
वृद्ध शेतकरी राजाराम वामन गोपाळे (वय ६५) यांचा बुधवार १७ ऑगस्ट २०२२ रोजी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नी सुमन यांनाही विजेचा धक्का बसला होता. या प्रकरणी, ‘महावितरण’कडून गोपाळे यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत होती. परंतु ‘महावितरण’च्या कार्यालयात हेलपाटे मारुनही त्यांची दखल घेतली नाही.
अखेर १५ फेब्रुवारी २०२४ रोजी आमसभेमध्ये मयत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी मदत करण्याची मागणी केली होती. त्यावेळी, ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबाला लवकर मदत करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना सभेत दिल्या होत्या. त्याची दखल घेत ‘महावितरण’कडून नुकसान भरपाई अदा करण्यात आली.