मुंबई – राज्यात आज सर्वाधिक 6555 नवीन करोनाबाध्ति रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 86 हजार 40 रुग्णांवर (ऍक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज 3658 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 1 लाख 11 हजार 740 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.8 टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 11 लाख 12 हजार 442 नमुन्यांपैकी 2 लाख 6 619 नमुने पॉझिटिव्ह (18.57 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 4 हजार 463 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 46 हजार 62 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज 151 करोनाबाधित रुग्णांच मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.27 टक्के एवढा आहे. राज्यात आज नोंद झालेले मृत्यू हे मुंबई मनपा-69, ठाणे मनपा-4, कल्याण-डोंबिवली मनपा-8, भिवंडी निजामपूर मनपा-3, मीरा-भाईंदर मनपा-1, वसई-विरार मनपा-4, नाशिक-2, धुळे-4,जळगाव-6,जळगाव मनपा-4, पुणे मनपा-23, पिंपरी-चिंचवड मनपा-8, सोलापूर मनपा-4, औरंगाबाद-11 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.