नगर (प्रतिनिधी) – शिवसेना हा एकच पक्ष असा आहे, ज्याची स्थापना हिंदुह्रद्सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी केली. या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शिवसेना तत्पर असून, त्यासाठी 24 तास शिवसैनिक उपलब्ध आहे. असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
शिवसेनच्या वर्धापन दिनानिमित्त उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली सामान्य गरजू लोकांना छत्रीचे वाटप शिवसेना उपनेते राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सुभाष लोंढे, अमोल येवले, संतोष गेनप्पा, जिल्हा उपप्रमुख गिरिष जाधव, शशिकांत देशमुख, सतीष मैड, परेश लोखंडे, मनीष गुगळे, भालचंद भाकरे, जेम्स आल्हाट, विशाल वालकर, आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी सातपुते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे बेधडक वक्तव्य करून, आपल्या मतांशी ठाम पणे राहणारे राज्यात नव्हे तर देशात एकमेव व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी राज्यातील सर्वसामान्य लोकांना आपल्या समस्या, अडचणी, प्रश्न मांडून त्याचे निवारण केले.