नगर (प्रतिनिधी) – तपोवन रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, अशी मागणी बांधकामविभाग व संबंधित ठेकेदाराकडे करण्यात आली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बांधकामविभाग व ठेकेदारावर नाराजी व्यक्त केली. या रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अन्यथा बांधकामविभागातील आधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा संबंधित प्रभागातील नगरसेवकांनी दिला आहे.
तपोवन रस्ता हा कॉटेज कॉर्नर ते इंद्रायणी हॉटेल जवळील नगर-औरंगाबाद महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. तसेच या परिसराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने लोकसंख्येत वाढत होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार करावे अशी मागणी नागरिकामधून होत आहे.
मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, निखिल वारे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, विनित पाऊलबुद्धे, सुनील त्रबंके, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण यांसह नागरिकांनी रस्त्याच्या विकासकामासाठी आ. संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यासाठी आ. जगताप यांनी या रस्त्यासाठी राज्यसरकारकडून सुमारे 3.5 कोटी रुपये मंजूर करुण आणले आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे अशी मागणी बांधकामविभाग व ठेकेदाराकडे करूनती त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रभाग 1 व 2 च्या नगरसेवकांनी रस्त्यावरील खड्डे बुजवन्याची मलमपट्टी न करता पुन्हा संपूर्ण रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अन्यथा बांधकामविभागातील आधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.