मुंबई – सध्या कोरोना सारख्या महाभयानक विषाणूने संपूर्ण भारतात हैदोस घातला असून, महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार पुढे हे मोठे आव्हान आसल्याचं दिसून येत आहे. या धोकादायक विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून उद्धव ठाकरे यांचे कौतुक होताना दिसत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि कवी ‘जावेद अख्तर’ यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
Maharashtra Govt under leadership of CM Uddhav Thackray needs to be congratulated for handling the Covid 19 with clear directives. My salute .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) April 4, 2020
जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना विषाणू बाबत स्पष्ट निर्देश देत आहेत, ते कौतुकास पात्र आहे. माझा त्यांना सलाम! असं जावेद अख्तर आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले.