नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने सर्व प्रवासी रेल्वे रद्द केल्या होत्या. मात्र लॉकडाउनचा कालावधी आता संपत आल्याने रेल्वे प्रशासनाने सेवा पूर्ववत करण्याची तयारी सुरु केली आहे. सर्व रेल्वे सुरक्षा कर्मचारी, कार्यरत कर्मचारी, रक्षक, टीटीई आणि अन्य अधिकारी यांना 15 एप्रिलपासून त्यांच्या पदांवर हजर राहण्यास सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, आता लॉकडाऊन वाढणारनसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेनेही सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे. मात्र, सरकारच्या हिरवा सिग्नलनंतरच रेल्वे गाडया सुरु होतील, असेही स्पष्ट केले आहे. यासाठी प्रशासनाने रेल्वे गाड्यांचे नियोजन केले असून यामध्ये गाड्यांचे, त्यांची संख्याचे वेळापत्रक असणार आहे. जवळपास ८० टक्के गाड्या पूर्ववत होण्याची शक्यता आहे. यामध्ये राजधानी, शताब्दी, दुरंतो या गाड्यांचा समावेश असणार आहे.
केंद्र सरकारच्या नियमानुसार, रेल्वे सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग आणि सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याची शक्यता सूत्रांकडून समजली जात आहे. दरम्यान, आयआरसीटीसीच्या अॅप आणि वेबसाइटवर 15 एप्रिलपासून तिकिटे उपलब्ध झाली आहेत.