चेन्नई : केंद्र सरकारचा सुधारित नागरिकत्व कायद्याचा (का) मुस्लिमांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मत नेता बनलेला अभिनेता रजनिकांत यांनी व्यक्त केले. भविष्यात या कायद्यामुळे जर भारतीय मुस्लिमांना कोणत्याही प्रकारे त्रास झाला तर त्याविरोधात सर्वात आधी मी निदर्शने करेन, असेही ते म्हणाले.
राजकीय पक्ष विद्यार्थ्यांचा वापर का कायद्याविरोधातील निदर्शनासाठी करून घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी कोणत्याही निदर्शनात सहभागी होण्याआधी वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. का कायदा हा मुस्लिम धर्मीयांच्या विरोधात नाही. राजकीत पक्ष त्याचा अपप्रचार करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
अन्य देशांतून आलेल्या स्थलांतरीतांची नेमकी संख्या समजण्याच्या दृष्टीने एनआरसी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. कोण नागरिक आहे, ते शोधणे महत्वाचे आहे. कागदपत्रांशिवाय येथे राहणारे कोण आहेत हे एनपीआरमुळे समजू शकते. तामिळी निर्वासितांना दुहेरी नागरिकत्वाचा पर्याय उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.