मुंबई – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील नाईटलाईफला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. तसेच आरे कारशेडवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार म्हणाले कि, पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ? एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बुट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला.. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे.
मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ?
एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बुट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2020
दरम्यान, मुंबईत नाईट लाईफ ही संकल्पना सुरू झाली असून 26 जानेवारीच्या रात्री पहिल्यांदाच काही भागातील हॉटेल्स व मॉल सुरू ठेवण्यात आले होते. पण या पहिल्या दिवशी माहिती अभावी लोकांचा मात्र जेमतेमच प्रतिसाद मिळाला. तसेच आरे कारशेडचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने एका समिती नेमली होती. यानुसार मेट्रो ३ कारशेड इतर ठिकाणी हलवणे व्यवहार्य नाही. त्यामुळे आरे कॉलनीमध्ये कारशेडचे काम सुरु करण्यात यावे, असे समितीने सांगितले आहे. परंतु, आरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नसल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.