नवी दिल्ली – दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ५० बुरखाधारी टोळीने विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला. लोखंडी सळई, काठीने विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निषेध केला आहे.
शरद पवार म्हणाले कि, जेएनयूमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर करण्यात आलेला हल्ला भ्याड आणि पूर्वनियोजित आहे. मी या घटनेचा निषेध नोंदवतो. हिंसाचाराच्या सहाय्याने लोकशाही मूल्ये आणि विचारांना दडपण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.
JNU students and professors were subjected to a cowardly but planned attack. I strongly condemn this undemocratic act of vandalism and violence. Use of violent means to suppress democratic values and thought will never succeed.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 5, 2020
दरम्यान, विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागातही उमटू लागले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कॅंडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला तर पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरले. त्यांनी अभाविपच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा दिल्या.