रोहतक : हरियाणाच्या गोलंदाजांच्या अचूक मा-यासमोर महाराष्ट्राच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे यंदाच्या रणजी मोसमातील पहिल्याच क्रिकेट लढतीत महाराष्ट्राला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. हरियाणाने महाराष्ट्राचा १ डाव आणि ६८ धावांनी पराभव करत विजय संपादित केला आहे. या विजयासह हरियाणाच्या खात्यात ७ गुण जमा झाले आहे.
Haryana Won by an innings and 68 Run(s) #HARvMAH @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/5kakypjGSE
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2019
हरियाणाने पहिल्या डावात ४०१ धावा केल्या होत्या. ४०१ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राचा पहिला डाव २४७ धावांवर आटोपला. त्यामुळे महाराष्ट्राला फाॅलोआॅनच्या नामुष्कीचा सामना करावा लागला.
End Innings: Maharashtra – 247/10 in 95.6 overs (S M Fallah 4 off 15, P C Dadhe 8 off 21) #HARvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 11, 2019
आपला दुसरा डाव सुरू केल्यानंतर देखील हरयाणाच्या गोलंदाजीसमोर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे फलंदाज ढेपाळले आणि दुस-या डावात महाराष्ट्राचा संघ २९ षटकात अवघ्या ८६ धावांवर संपुष्टात आला. दुस-या डावात महाराष्ट्राकडून नौशाद शेखने सर्वाधिक २७ धावा केल्या.
WICKET! Over: 28.6 S M Fallah 0(2) b H V Patel, Maharashtra 86/10 #HARvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2019
हरियाणाकडून गोलंदाजीत हर्षल पटेल याने पहिल्या डावात ७० धावा देत ४ आणि दुस-या डावात २२ धावा देत ५ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आशिष हुड्डाने देखील पहिल्या डावात ३ आणि दुस-या डावात ४ गडी बाद करत महत्वपूर्ण कामगिरी बजावली.