अनंतकुमार हेगडेंच्या दाव्यावर संजय राऊतांचे ट्टिट
मुंगई : केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे 80 तासांचे मुख्यमंत्री झाल्याचा दावा भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे केला आहे. मात्र त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे खासदारसंजय राऊत यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातून 40 हजार कोटी परत पाठवणे हा महाराष्ट्राबरोबर विश्वासघात असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
Bjp mp @AnantkumarH says @Dev_Fadanvis as CM for 80 hours, moved maharashtra’s 40000 cr Rs to center ? This is treachery with maharshtra , महाराष्ट्र के साथ गद्दारी है @Officeof UT
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2019
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देण्यात आलेले 40 हजार कोटी केंद्राला परत पाठवण्यासाठी 80 तासांचे मुख्यमंत्री बनले होते का? असा अनंतकुमार हेगडे यांच्या दाव्याचा दाखला देत संजय राऊत यांनी सवाल केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
दुसरीकडे नवाब मलिक यांनीही भाजपवर टीका केली. या दाव्यात तथ्य असेल तर हा फक्त महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांवरही अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले. हे ठरवून केलेले नाटक होते. फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी 80 तासांच्या आत 40 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून केंद्राकडे परत पाठवले, असा दावा अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.