मुंबई – केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तळ्यात-मळ्यात असणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंब्याचे पत्र न दिल्याने राज्यपालांनी दिलेल्या 24 तासांच्या मुदतीत शिवसेना सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्याने “मातोश्री’ची कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट केले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती’ बच्चन. हम होंगे कामयाब.. जरूर होंगे…’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
“लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।’
बच्चन.
हम होंगे कामयाब..
जरूर होंगे…— Sanjay Raut (@rautsanjay61) November 12, 2019
दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला 48 तासांची मुदत वाढवून देण्यास नकार दिल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. आघाडीची भूमिका ठरली नसल्याने राज्यात सत्ता स्थापनेचा खेळखंडोबा कायम असून महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरू झाली आहे.